यशवंत चिंतनिका १९

संध्या-छाया

चाळिशी म्हणजे जीवनाची माध्यान्ह. बालपण केव्हाच संपलेलं असतं. तारूण्य संपत आलेलं असतं. एकीकडे म्हातारपणाची चाहूल लागत असते, तर दुतरीकडे तारूण्याची गोड, आनंदी, जिद्दीची, उमेदीची वर्षं अजूनही सकाळीच खुडलेल्या फुलांसारखी ताजी असतात. त्याचबरोबर आता सुकून जाण्याची वेळ आली आहे, ही खंतही मनात जन्म घेत असतेच. एकीकडे जीवनाबद्दल प्रचंड अभिलाषा, तर एकीकडे संपत चाललेल्या प्रवासाचं टोक  नजरेसमोर येऊ लागलेलं!

आयुष्याची संध्याकाळ सुखासमाधानानं ख-या अर्थानं निवांतपणात, निरोगी मनानं घालवायची असेल, तर त्याची तयारी चाळिशीतच करायला हवी. कडलट आठवणी, कटू अनूभव, दु:खद प्रसंग-सगळं बाजूला ठेवून, नव्या उमेदीनं पुढच्या प्रवासाच्या तयारी करायला हवी.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई

धर्मादाय नोंदणी क्र. एफ-१०६४३ मुंबई दि. १७/०९/१९८५,
सोसायटी नोंदणी क्र. ५३२ दि. ३०/०७/१९८५,
जन. जगन्नाथराव भोसले मार्ग, मुंबई - ४०० ०२९.

दूरध्वनी : 022-22028598 / 22852081 / 22045460
फॅक्स : 91-22-22852081/82
ईमेल : ybchavan100@gmail.com

सेंटर निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे

http://ketkardnyankosh.in
http://virashinde.com
http://vkrajwade.com