यशवंत विचार
पक्ष चालतात ते निष्ठेने चालतात हे जरी खरे असले, तरी लोकशाही पक्ष हे विचारांच्या निष्ठेने चालले पाहिजेत असा तुमचा-आमचा आग्रह असला पाहिजे. व्यक्तीवरच्या निष्ठा चुकीच्या आहेत. त्या निष्ठा काम देत नाहीत; कारण व्यक्ती शेवटी चूक करू शकते. मनुष्य कितीही मोठा असला तरी त्याच्या हातून चूक होणार नाही असे विधान कोणीही करू शकणार नाही.



















































































































