यशवंत विचार
तुमची शेती हा निव्वळ तुमचा विचार राहिलेला नाही. तुमची राहिलेला नाही. शेती हा देशाचा विषय झाला आहे. आम्ही आमची शेती पिकवली नाही तर आम्ही आमच्या घरामध्ये उपाशी राहू असे म्हणून तुम्हाला आता चालणार नाही. तुमची शेती तुमची आहे; पण तशीच ती देशाचीही आहे. तुमची शेती पिकली नाही तर तुमचे नशीब पिकणार नाही एवढाच त्याचा अर्थ नाही, तर त्याचबरोबर देशाचेही नशीब पिकणार नाही.



















































































































