यशवंत विचार
आम्ही आमच्यामध्ये नाना त-हेच्या सामाजिक भेदाभेदांची मोठी थोरली उतरंड रचली म्हणून हिंदुस्थान दुबळा झाला. आम्ही खटपट करतो आहोत आर्थिक क्रांती करावयाची, औद्योगिक क्रांती करावयाची. हातात आलेल्या मोठया थोरल्या स्वातंत्र्याच्या शक्तीचा, लोकशाहीच्या सत्तेचा वापर करावयाचा प्रयत्न चालला आहे, पण गाडा अजूनही काही पुढे जात नाही.याचे कारण समाजातील ही उतरंड आहे. उतरंड हा शब्द मी मुद्दामच वापरीत आहे; कारण आम्ही सर्व एकमेकांच्या डोक्यावर बसलो आहोत आणि वरचा जो खालच्याच्या डोक्यावर बसला आहे, त्याचे तोंड बेद करून बसला आहे. खालच्याला काही वावच नाही. समाजामध्ये आम्ही ही जी उच्चनीचतेची, जातिभेदाची, वर्णभेदांची उतरंड रचलेली आहे ती केवळ एकाच प्रांतात रचलेली नसून सर्व हिंदुस्थानभर रचलेली आहे. ही उतरंड मोडण्याचे काम ज्या दिवशी आपण करू त्या दिवशी आपण खरी क्रांती केली असे मी म्हणेन.



















































































































